श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्टचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

 श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्टचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा


पनवेल/प्रतिनिधी 
गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्टचा वर्धापन दिन आगरी कोळी भवन नेरूळ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे वनमंत्री श्री.गणेश नाईक उपस्थित होते. 
       यावेळी वन मंत्री श्री.गणेश नाईक व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी विद्यार्थांचा गुणगौरव व संस्थेसाठी विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यात आला.श्री.गणेश नाईक यांनी संस्थेच्या सामाजिक योगदानाबद्दल व संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख,संस्थेचे सचिव जगदीश जाधव तसेच संस्थेतील सदस्यांचे या सामाजिक कार्याबद्दल विशेष कौतुक केले व संस्थेला दहा लाख रुपयांची देणगी जाहीर केली.यावेळी कार्यक्रमाला माजी आमदार श्री.दीपक आबा साळुंखे व इतर मान्यवर उपस्थित होते.

कोट.
श्री.गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट मागील २६ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात तसेच अनाथ,अपंग व शिक्षणापासून दुर्बल असणाऱ्या घटकांच्या शिक्षणासाठी कार्यरत आहे.तसेच या संस्थेतून गतवर्षी एक अनाथ विद्यार्थी सी.ए परीक्षा देऊन उत्तीर्ण झाला.आजपर्यंत शेकडो माध्यमिक,उच्च माध्यमिक,तंत्र शिक्षण घेऊन उत्तीर्ण झाले.राज्यातील हजारो अनाथ विद्यार्थ्यांसाठी संस्था एक आशेचा किरण आहे.
Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image