साथरोग- किटकजन्य आजार टाळण्याकरिता काळजी घ्या : आयुक्त श्री.मंगेश चितळे यांचे नागरिकांना आवाहन


एक दिवस कोरडा दिवस पाळू, डेंग्यू ,मलेरिया आजार टाळू


साथरोग- किटकजन्य आजार टाळण्याकरिता काळजी घ्या : आयुक्त श्री.मंगेश चितळे यांचे नागरिकांना आवाहन


पनवेले,दि.25 : पावसाळी कालावधीत विविध प्रकारचे किटकजन्य तसेच साथजन्य आजार उद्भवण्याची शक्यता असते.याच पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी ‘बुधवार’ हा दिवस कोरडा दिवस पाळावा असे आवाहन आयुक्त श्री.मंगेश चितळे यांनी केले आहे.

पावसाचे पाणी सध्या सर्वत्र साठलेले आहे या पाण्यामध्ये डेंगू ,मलेरियाच्या डासांची पैदास होण्याची शक्यता असते. म्हणूनच वैद्यकिय आरोग्य विभागामार्फत  किटकजन्य आजराविषयी खबरदारी घेण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. महापालिकेने दिलेल्या सूचनांचे पालन करुन नागरिकांनी पुरेशी  दक्षता बाळगल्यास या आजारांवर वेळीच प्रतिबंध घालणे शक्य आहे. 

      पावसाळ्यांनंतर विविध किटकजन्य रोगाचे प्रमाण वाढत असते. अशा वेळी नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून प्यावे. तसेच भाज्या,फळे इत्यादी वस्तू स्वच्छ धुवून मगच खाण्यासाठी वापराव्यात. सर्व केरकचरा घंटा गाडीतच टाकावा. घर व सभोवतालचा परिसर जास्तीत जास्त स्वच्छ ठेवावा. आपल्या इमारतीतील पाण्याची टाकी निर्जंतुक करावी. साचलेले पाणी ,डबकी यातील पाणी वाट काढून वाहून जाईल अशी सोय करावी जेणे करून डास उत्पन्न होणार नाहीत. शिळे व उघड्यावरचे अन्न खाऊ नये, विहरीचे पाणी शुध्दीकरण करूनच पिण्यास वापरावे. अतिसार झाल्यास क्षारसंजिवनी मिश्रणाचा वापर करावा. घरांतर्गत डास उत्पत्तीस्थाने टाळण्यासाठी घरातील फुलदाणी, मनीप्लँट,वॉटरकूलर,फ्रिजच्या मागील ट्रे, पाणी साठवणीचे ड्रम इत्यादीमधील पाणी आठवड्यातून एक दिवस ‘बुधवारी’ पुर्णपणे काढून कोरडे करून ‘कोरडा दिवस’  पाळावा, अशा सूचना वैद्यकिय आरोग्य विभागाचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी केले आहे.

     जेवणापूर्वी व शौचास जाऊन आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुणे, पुर्ण शिजवेले,ताजे अन्न खावे, रस्त्यांवरील उघडे अन्नपदार्थ खावू नये. ताप सर्दी, खोकला अशा प्रकारची लक्षणेअसल्यास नजिकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.

     हिवताप,डेंगू, मेंदूज्वर, चिकनगुनिया,मलेरिया असे साथीचे रूग्ण आपल्या आसपास आढल्यास जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी किंवा रूग्णालयाशी संपर्क साधावा. रूग्णालयांनी, प्रयोगशाळांनी साथीच्या रोगाचे रूग्ण महापालिकेला  idsppanvelcorporation@gmail.com या ईमेलआयडीवरती कळवावे असे आवाहन वैद्यकिय आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image