विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या तत्परतेने भुयारी मार्गावरील साचलेल्या पाण्याचा प्रश्‍न निकाली

विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या तत्परतेने भुयारी मार्गावरील साचलेल्या पाण्याचा प्रश्‍न निकाली


पनवेल, दि.2 (संजय कदम) ः पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या तत्परतेमुळे पनवेल रेल्वे स्थानकामधील भुयारी मार्गावर साचणार्‍या पाण्याचा प्रश्‍न निकाली निघाला आहे.

पनवेल रेल्वे स्थानका मधील भुयारी मार्गातील पायर्‍यांजवळ पाणी साचले होते, गेले दोन दिवस थोड्या प्रमाणात पाणी होते परंतु आज पाण्याचे प्रमाण वाढले होते आणि त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणाहून पायी चालणे  त्रासाचे झाले होते. याबाबत तेथील प्रवाशांनी याची माहिती पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांना दिली. सदर तक्रारी बाबत त्वरित कार्यवाही  करून तेथील अधिकारी राजेश पाटील यांच्या कडून माहिती घेतली असता  सदर बेसमेंटमध्ये पाणी उपसा करणारी मोटर नादुरुस्त झाली होती. त्यामुळे जास्त प्रमाणात पाणी साचले होते हे त्यांनी मान्य केले. येत्या 12 तासात आम्ही सदर मोटर दुरुस्त करून चालू करू असे त्यांनी प्रीतम म्हात्रे सांगितले. त्याप्रमाणे सदर मोटर दुरुस्त करून पाणी उपसा सुरू झाला व त्या ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा झाला. याबद्दल विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांचे प्रवाशी वर्गाने आभार मानले आहेत.


Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image