जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर

जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर

पनवेल प्रतिनिधी:- पनवेल तालुका पोलीस ठाण्यामध्ये कर्तव्यावर असणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र विठ्ठल म्हात्रे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. नवी मुंबई पोलीस दलामध्ये प्रचंड दबदबा असणारे अंमलदार म्हणून म्हात्रे यांची ओळख आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांना पदक जाहीर करण्यात आले.

 रायगड पोलीस दलात जितेंद्र म्हात्रे भरती झाले. माणगाव खालापूर पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग रायगड अलिबाग, तसेच पोलीस मुख्यालय व त्यानंतर 2007 पासून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात गुन्हे शाखा , पनवेल तालुका पोलीस खारघर त्यानंतर लागलीच पनवेल तालुका पोलीस ठाण्यामध्ये त्यांची बदली झाली. सध्या तेथेच ते कर्तव्यावर आहेत. दरोडेखोर भिकू वाघमारेचा त्यांनी सामना करून अटक केल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांना पकडण्यासाठी त्यांनी अंमलदार म्हणून संबंधित अधिकाऱ्यांची साथ केली. म्हात्रे यांना पोलीस दलातून रिवार्ड सुद्धा मिळालेले आहेत.

त्यांना भारतीय 76 व्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर करण्यात आलेले आहे.

Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image