सुमन केदारी यांचे दुःखद निधन

 सुमन केदारी यांचे दुःखद निधन 



उरण दि २३(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील पाणदिवे येथील रहिवाशी सुमन शिवाजी केदारी (वय ६५) यांचा गुरवार दिनांक १२/१२/२०२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. सुमन केदारी या सर्वांच्या सुख दुःखात नेहमी धावून जायच्या. प्रेमळ व मनमिळावू असा त्यांचा स्वभाव होता. पती,४ मुले, ५ नाती असा त्यांचा कुटुंब परिवार आहे. सुमन केदारी यांच्या मृत्यूने केदारी परिवार व ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे. सुमन केदारी यांचा दशक्रिया विधी शनिवार दिनांक २१/१२/२०२४ रोजी श्री माणकेश्वर- उरण येथे संपन्न झाला. दिनांक २४/१२/२०२४ रोजी तेरावा विधी त्यांच्या राहत्या घरी पाणदिवे येथे संपन्न होणार आहे. या दुःखद प्रसंगी कुठल्याही प्रकारचे दुखवटे स्वीकारले जाणार नसल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.
Popular posts
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
पनवेल परिसरातील ओपन लॉनवरील विवाह समारंभाला आता पहिली पसंती; हटके लग्न सराई, ठरतेय मुख्य आकर्षक
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन
Image