घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन


*घरो घरी तिरंगा उपक्रमांतर्गत महापालिकेच्यावतीने तिरंगा मॅरेथॉन*

घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन



पनवेल, दि. ११: माननीय आयुक्त श्री. मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक ११ऑगस्ट रोजी पनवेल महानगरपालिकेच्यावतीने 'घरोघरी तिरंगा' या उपक्रमांतर्गत तिरंगा सन्मानार्थ 'तिरंगा मॅरेथॉन'  आज काढण्यात आली.  'भारत माता की जय', वंदे मातरमच्या घोषणा देत महापालिका मुख्यालय ते वडाळे तलाव पर्यंत या तिरंगा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. 

केंद्र शासनाच्या 'घरोघरी तिरंगा' उपक्रम अंतर्गत आज रविवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या नेतृत्वाखाली 'तिरंगा मॅराथॉन' आयोजित करण्यात आली. यामध्ये सुमारे 400 हून अधिक विद्यार्थी, नागरिक,  महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा विभाग आणि स्वच्छतादूत यांनी सहभाग घेतला.पनवेल महानगरपालिका कार्यालय- जय भारत नाका-स्वातंत्र्यवीर सावरकर चौक- बल्लाळेश्वर मंदिर- के. वि. कन्या शाळा- या मार्गे  जाऊन शेवटी वडाळे तलाव येथे मॅराथॉनची सांगता झाली .

भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 77 वा वर्धापन दिन निमित्ताने  शासन निर्देशानूसार 09 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये महापालिका कार्यक्षेत्रात  ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.  या उपक्रमांतर्गत 12 ते 14 ऑगस्ट रोजी बचतगटामार्फत 'तिरंगा मेला 'चे आयोजन करण्यात येणार  आहे. दिनांक 13 ऑगस्ट  रोजी ‘देवकी मीडिया प्रस्तुत “ऐ वतन तेरे लिये” या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 14 ऑगस्ट रोजीतिरंगा सन्मानार्थ बाइक व सायकल तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. 

याबरोबरच महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी  दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट  असे तीन दिवस घरोघरी तिरंगा फडकवावा. त्यासोबतचे स्वत:चे सेल्फी काढून www.harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड  करावे असे  आवाहन आयुक्त श्री. मंगेश चितळे यांनी केले आहे. 

पनवेल महानगरपालिकेच्यावतीने  महापालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या ' घरोघरी तिरंगा ' या उपक्रमात  नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.

Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image