महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाली येथील विश्रामगृहाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपुजन

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाली येथील विश्रामगृहाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपुजन


रत्नागिरी, दि. 19 (जिमाका) : पाली येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने बांधण्यात येणाऱ्या विश्रामगृहाचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज करण्यात आले.

            याप्रसंगी एमआयडीसीचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, कार्यकारी अभियंता सचिन राक्षे, प्रांताधिकारी जीवन देसाई, प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, बाबू म्हाप, सरपंच विठ्ठल सावंत, उपसरपंच संतोष घाडगे आदी उपस्थित होते.  

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यात आली आहेत. महामंडळाकडून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या पाली येथे अद्ययावत विश्रामगृह बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जागा हस्तांतरीत करण्यात आली व प्रस्तावित नवीन अद्यावत विश्रामगृह उभारण्यात येणार आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ ७७७.०० चौ.मी. असे आहे. प्रस्तावित विश्रामगृह दुमजली असून त्यामध्ये १ अतिमहत्वाचा कक्ष व ४ सर्वसामान्य कक्ष आहेत. तसेच अतिथीकरिता प्रतिक्षा जागा, भांडारगृह, स्वयंपाकगृह, जेवणाची खोली, प्रसाधनगृह, युटीलिटी खोलीचा समावेश करण्यात आला आहे.


Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image