शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरी येथे अधिव्याख्याता पदांसाठी शुक्रवारी 11 वाजता मुलाखती

शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरी येथे अधिव्याख्याता पदांसाठी शुक्रवारी 11 वाजता मुलाखती


रत्नागिरी, दि. 10 (जिमाका) : शासकीय  तंत्रनिकेतन येथे विविध अभ्यासक्रमांकरिता तात्पुरत्या स्वरुपात  तासिका तत्वावर अधिव्याख्यता पदांसाठी शैक्षणिक वर्ष 2024-25 वर्षाकरिता नियुक्ती करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असल्याचे शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. रा.के. वाकोडकर यांनी कळविले आहे.

स्थापत्य, उपयोजित यंत्रशास्त्र, संगणक, विद्युत, अणुविद्युत, यंत्र, मेकॅट्रॉनिक्स या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक पात्रता बी.ई, प्रथमश्रेणी, औषधनिर्माणशास्त्र साठी बी.फार्म प्रथमश्रेणी, इंग्रजी, गणित,रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र साठी एम ई प्रथम श्रेणी, एम.एससी प्रथमश्रेणी आवश्यक.

तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी आपला अर्ज, मुळ प्रमाणपत्र व  झेरॉक्स प्रतीसहित 12 जुलै रोजी सकाळी 11 वा. मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. 

स्थापत्य, उपयोजित यंत्रशास्त्र, विद्युत,  शास्त्र, औषधनिर्माणशास्त्र यांनी मुख्य इमारत संबंधित विभाग तर संगणक, अणुविद्युत, यंत्र, मेकॅट्रॉनिक्स यांनी विस्तारीत इमारत संबंधित विभाग येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. 


Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image