शेकापचे प्रीतम म्हात्रे यांनी घेतला कार्यकर्त्यांसमवेत भाजी-भाकरीचा आस्वाद


शेकापचे प्रीतम म्हात्रे यांनी घेतला कार्यकर्त्यांसमवेत भाजी-भाकरीचा आस्वाद



पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा उमेदवारी अर्ज मंगळवारी पिंपरी येथे दाखल करण्यात आला. या वेळी पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पनवेल, उरण व कर्जत विधानसभा मतदारसंघातून आलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसमवेत घरातून आणलेल्या भाजी, भाकरी तसेच मिरचीच्या ठेच्याच्या आस्वाद घेतला. या प्रकाराकडे उपस्थित असलेल्या सर्वांचे लक्ष वेधले गेले.
शेकापच्या राजकीय वर्तुळात प्रीतम म्हात्रे यांच्याकडे भविष्यातील नेतृत्व म्हणून बघितले जात आहे. पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते हे पद भूषवताना शेकापचे प्रीतम म्हात्रे यांनी सामान्य जनतेचे प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न केला. पक्षातील नव्या-जुन्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या विचारांची सांगड घालून प्रीतम म्हात्रे यांची पुढील राजकीय वाटचाल सुरू आहे. शेकापने आजवर अनेक मोर्चे, आंदोलने केली आहेत. यानिमित्त येणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांच्या नाश्ता, पाण्याची सोय केली जाते. सुकट-भाकरी, मिरचीचा ठेचा असा या वेळी बेत असतो. शेकापच्या या परंपरेची प्रचिती मंगळवारी संजोग वाघेरे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आली. प्रीतम म्हात्रे यांनी मंगळवारी स्वतःच्या घरून कार्यकर्त्यांसाठी भाजी-भाकरी व मिरचीचा ठेचा आणला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी झाडाच्या सावलीखाली उभे राहून प्रीतम म्हात्रे यांनी कार्यकर्त्यांसमवेत जेवणाचा आस्वाद घेतला. हा क्षण अनुभवताना कार्यकर्ते भारावून गेले होते.

Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image