पाच वर्षात ११२५ राखीव घरे, प्रत्यक्षात मिळाली १११;नवी मुंबईतील पत्रकारांच्या घरांच्या स्वप्नावर पाणी

पाच वर्षात ११२५ राखीव घरे, प्रत्यक्षात मिळाली १११;नवी मुंबईतील पत्रकारांच्या घरांच्या स्वप्नावर पाणी


नवी मुंबई : नवी मुंबईतील पत्रकारांना सिडको निर्मित घरांच्या लॉटरीमध्ये सुलभतेने घरे मिळावीत म्हणून सिडकोकडून आरक्षण ठेवण्यात आलेले आहे.परंतु हे आरक्षण पत्रकारांनासाठी केवळ मृगजळ ठरले असून मागील पाच वर्षामध्ये विविध सोडतीमध्ये पत्रकारांसाठी आरक्षित ठेवलेल्या एकूण घरांच्या केवळ १० टक्के सदनिका प्रत्यक्षात पत्रकारांच्या पदरामध्ये पडल्या असून उर्वरीत ९० टक्के सदनिका ज्या पत्रकारांना मिळणे हा त्यांचा हक्क होता, त्या सदनिका पत्रकारांच्या हातून सूटून गेल्या आहेत.माहितीच्या अधिकारामधून सदर सांख्यकीय माहिती बाहेर आली असून पत्रकारांकडून वारेमाप प्रसिद्धी करून घेणारे सिडको महामंडळ हे प्रत्यक्षात पत्रकारांना सुलभतेने घरे मिळावित या बाबत मात्र उदासिन असून  सिडकोने घरांचे स्वप्न दाखवून प्रत्यक्षात पत्रकारांच्या हातात  बाबाजीचा ठूल्लू  दिल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. कारण २०१९ नंतर जाहीर झालेल्या मास हौसिग योजनेमधून पत्रकांराना त्यांच्या राखीव कोट्यातून एकही सदनिका मिळालेली नाही.

२०१८ ते २०२२ या कालावधीमध्ये सिडकोंच्या मास हौसिंग -१८, मास हौसिंग-१९, मास हौसिंग जानेवारी २२,मास हौसिंग ऑगष्ट २२ आणि दिवाळी लॉटरी २०२२ या महत्त्वाच्या पाच हौसिंग लॉटरीचा डेटा माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष बसवेकर यांना सिडको कडून माहिती अधिकारात प्राप्त झाला आहे. या एकूण पाच लॉटरी मध्ये एकूण ११२५ सदनिका या पत्रकांरासाठी राखीव ठेवल्या होत्या.या ११२५ पैकी एकूण ४५७  सदनिका मिळण्यासाठी पत्रकार विजेता ठरले होते.पण त्यातील प्रत्यक्षात केवळ १११ पत्रकारांनाच घरे मिळाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
फिल्डवरील वार्ताहर,बातमीदार प्रतिनिधी इत्यादी पत्रकारांबरोबरच संपादकीय विभागीतील सपांदक,उपसंपादक, वृत्तसंपादक  व्यंगचित्रकार,घटना घडामोडीचे विश्लेषण करून लिहिणारे स्तंभलेखक ही सगळी मंडळी पत्रकार या व्याख्येत मोडतात.तसेच मुंबईतील विविध वृत्तपत्रे व वाहिन्यामध्ये काम करणारे परंतु प्रत्यक्षात नवी मुंंबईमध्ये निवासी असणाऱ्या अशा पत्रकारांची संख्या खूप मोठी आहे.तसेच छोटी वर्तमानपत्रे व साप्ताहिके तसेच मुक्त व्यावसायिक पत्रकार यांची ही संख्या लक्षणीय आहे. प्रस्तापित प्रिंट मिडीया व विविध वाहिन्यामधील मोजके पत्रकार अपवाद वगळता यातील बहूतांश पत्रकार हे तूटपुंजे वेतन किंवा मानधन यावर काम करतात.यातील बहूसंख्य पत्रकारांचं नवी मुंबईमध्ये सिडकोच्या माध्यमातून आपले हक्काचे छोटे होईना छप्पर असावे हे स्वप्न असते.परतुं सिडकोने पत्रकारांसाठी घरांच्या सोडतीमध्ये आरक्षण तर ठेवले परतुं पत्रकारांची पात्रता निश्चित करण्यासाठी  माहिती व जनसंपर्क विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडून पत्रकार असल्याचे प्रमाणपत्रांची अट ठेवली.हे प्रमाणपत्र मिळणे ही फारच सिलेक्टिव्ह तसचे क्लिष्ट व वेळखाऊ प्रक्रिया असल्यामुळे विजेता ठरूनही बऱ्याच पत्रकारांना घरे मिळाली नाहीत.गेल्या पाच वर्षात पत्रकारांच्या आरक्षीत कोट्यातून सिडकोच्या घरांच्या विविध सोडतीमध्ये ४५७ पत्रकार सदनिकासाठी विजेता ठरले परंतु त्यातील केवळ १११ जणांनाच प्रत्यक्षात घरे मंजूर झाली. उरलेले ३४६ पत्रकार विजेता होऊनही घरे मिळवू शकले नाहीत. हा अनुभव पाहता  भिक नको पण कुत्रे आवार या म्हणीचा प्रत्यय येऊ लागल्याने गरज असूनही सोडतीमध्ये भाग घेण्यास पत्रकार उदासीन झाले व विजेता ठरूनही प्रत्याक्षात घर मिळणार नसल्याने  पत्रकारांच्या कोटयातून अर्ज भरण्याचे स्वारस्य पत्रकारांमध्ये उरले नाही. यासाठी सिडकोचे चूकीचे धोरण संपूर्णतः जबाबदार ठरले.परंतु त्यामुळे पत्रकांराचे घरांचे स्वप्न भंगले ही न भरून येणारी हानी आहे.
अनेक वेळा या संबंधी पत्रकारांनी सिडकोचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक तसेच जनसंपर्क विभाग यांच्याकडे तक्रारी केल्या.शेवटी यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी पत्रकारांना घरे मिळण्याची प्रक्रिया सूलभ करण्याच्या सूचना दिल्या. तेव्हा आता जानेवारी २४ नंतर निघणाऱ्या सोडतीमध्ये म्हाडाच्या धर्तीवर पत्रकार कोट्यातून अर्ज करणाऱ्या अर्जदारांची पत्रकार असल्याची पात्रता सिडको स्तरावरच निश्चित असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे छोटी वर्तमानपत्रे,साप्ताहिके व फ्रि लॉन्स काम करणारे पत्रकार यांच्यावर या पुढे अन्याय होणार नाही अशी अपेक्षा आहे.
सद्या सिडको महागृहनिर्माण योजना २०२४ चे अर्ज भरण्यांची मुदत २७ मार्च अखेर पर्यंत चालू  आहे.या योजनेत पत्रकांरासाठी एकूण ३१ सदनिकां राखीव असून पत्रकारांना याचा पूर्ण लाभ सिडकोने पत्रकारांना मिळवून द्यावा अशी अपेक्षा पत्रकार वर्गाकडून होत आहे
----------------------------------------------------------------------------------------------------------------------

अधिक माहितीसाठी - सुभाष बसवेकर माहिती अधिकार कार्यकर्ता पनवेल - 9223516920
Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image