स्पर्श अभियानांतर्गत खारघरमध्ये महापालिकेच्यावतीने ‘कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन’


स्पर्श अभियानांतर्गत खारघरमध्ये महापालिकेच्यावतीने ‘कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन’



पनवेल,दि.9 : पनवेल महानगरपालिकेमार्फत ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत आज दिनांक 9 फेब्रुवारी रोजी पनवेल महापालिका आणि सहाय्यक संचालक आरोग्य सेवा(कृष्ठरोग) अलिबाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमानातून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 5 खारघर येथे सर्व आरोग्य विभागातील कर्मचा-यांची स्पर्श अभियानांतर्गत खारघरमध्ये ‘कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन’स्पर्धा घेण्यात आली.

पनवेल महानगरपालिकेमार्फत ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान 2024  दिनांक 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत राबविण्यात येत आहेत. आयुक्त श्री.गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या पंधरवड्यात कुष्ठरोगाविषयी विविध आरोग्य शिक्षणाचे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या कार्यक्रमांतर्गत आज खारघर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ‘कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मॅरेथॉन स्पर्धेच्या सुरूवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 यावेळी उपायुक्त गणेश शेटे,मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी,डर्मेटॉलॉजी असोशिएशनचे डॉ.कुलकर्णी, अलर्ट इंडिया एनजीओचे अँथनी डिसौजा, महाराष्ट्र कुष्टपिडीत संघटनेचे अध्यक्ष अशोक अंबेकर,रायगड जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रामदास झोडपे, सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय आरोग्य् अधिकारी, मुख्यालयातील सर्व वैद्यकिय अधिकारी तसेच कर्मचारी, एएनएम,जीएनएम,आशा वर्कर्स, वॉर्ड बॉय, खारघर गाव जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.

नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 5 खारघर येथे उपायुक्त गणेश शेटे यांनी हिरवा झेंडा दाखवून या स्पर्धेस सुरूवात झाली. स्पगेटी, विबग्योर शाळा, मोनार्च लक्झरी चौक, सेक्टर 18, मुर्बी गाव स्मशान भूमी चौक ,सेंट्रल पार्क ब्रीज येथे संपली. स्पर्धेच्या सुरूवातीला  मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी उपस्थितांना कुष्ठरोगाविषयी जनजागृतीपर माहिती दिली व समारोपावेळी उपस्थितांचे आभार मानले.  ‘कुष्ठरोग निमुर्लनासाठी त्वरा करा, कुष्ठरोगास बहुविध औषधोपचारासाठी प्रवृत्त करा’ अशा आशयाचे फलक यावेळी कर्मचाऱ्यांनी हाती घेतले होते. उपायुक्त गणेश शेटे यांच्या हस्ते मॅरेथॉनमधील विजेत्यांना बक्षीस व प्रशस्तीपत्र वितरण करण्यात आले. 


चौकट

आज दिनांक 9 फेब्रुवारी रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पनवेल येथे ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान 2024  अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये अलर्ट इंडिया एनजीओचे कमलेश चव्हाण यांनी कुष्ठरोगाबद्दल महाराष्ट्रात सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला तसेच कुष्ठरोगामागची कारणे, महाराष्ट्रात कुष्ठरोगाचा प्रसार होण्यामागची कारणे व त्यासाठी राबविण्यात येणाऱ्या लेप्रसी इलिमिनेशन ॲक्शन प्रोग्रॅम बद्दलची माहिती दिली. 

तसेच वैद्यकिय अधिकारी साथरोग डॉ. आकाश ढासळे यांनी राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमाची माहिती उपस्थितांना दिली. यामध्ये किटकजन्य आजार नियंत्रणाच्या उपाय योजना, त्याचे रिपोर्टिंग, उद्रेक व्यवस्थापन, रेबीज कंट्रोल प्रोग्रॅम, लसीकरण,वायू प्रदूषणाचा मानवी शरीरावरती होणारा परिणाम व उपाययोजना याबाबत माहिती दिली.

यावेळी मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारीडॉ.आनंद गोसावी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 यावेळी माता बाल संगोपन अधिकारी डॉ.रेहाना मुजावर, डॉ. उमेश ऐगल, वैद्यकिय अधिकारी डॉ.वैभवी निंबाळकर आणि उपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने अर्जुन ठाकूर , सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे एएनएम,जीएनएम, फार्मासिस्ट उपस्थित होते.

Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image