लाचेची मागणी केल्या प्रकरणी आरटीओ एजंट विरोधात गुन्हा दाखल

 लाचेची मागणी केल्या प्रकरणी आरटीओ एजंट विरोधात गुन्हा दाखल


नवीन पनवेल : पनवेल आरटीओ कार्यालयात वाहनाची नोंद करण्यासाठी 18 हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी आरटीओ एजंट कमलेश सिंह यांच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नोव्हेंबर महिन्यात देखील लाच मागितल्या प्रकरणी एका एजंट वर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

        पनवेल ( कळंबोली) आरटीओ कार्यालयात 44 वर्षीय तक्रारदार यांच्या टँकरचे ओपन बॉडी अशी आरसी बुक व परमिट मध्ये नोंद करण्याच्या कामाकरीता गेले असता खाजगी इसम आरटीओ एजेंट कमलेश किसनपाल सिंह यांनी या कामाकरीता १८ हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा काम होणार नाही असे सांगितले. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे यांच्या पथकाने पंच-साक्षीदार यांच्या समक्ष केलेल्या पडताळणीत खाजगी इसम कमलेश सिंग यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरुद्ध भ्र.प्र.आधी.१९८८(संशोधन २०१८) चे कलम ७ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
         सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ अँन्टी करप्शन ब्युरो, ठाणे दुरध्वनी  क्रमांक 022- 20813598/ 20813591, टोल फ्रि क्रं. १०६४ यावर संपर्क साधावा.
 


Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image