नवी मुंबई येथे उमेद अभियानाच्या वतीने ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गटांच्या महिलांच्या शेतातील उत्पादनांचा तांदूळ आणिआंबा महोत्सव

नवी मुंबई येथे उमेद अभियानाच्या वतीने  ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गटांच्या महिलांच्या शेतातील उत्पादनांचा तांदूळ आणिआंबा महोत्सव


नवी मुंबई (दिनांक १७) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान - उमेद च्या राज्यभरातील स्वयंसहाय्यता गटांच्या शेतातील उत्पादनाच्या आधारित तांदूळ आणि आंबा महोत्सव दिनांक २०, २१ आणि २२  मे रोजी पुणे विद्यार्थी गृह चे विद्याभवन, नेरूळ येथे आयोजित केला आहे. 

 राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांच्या शेतातील तांदुळाच्या च्या विविध जाती, सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला हापूस, केशर, पायरी इत्यादी प्रकारचा आंबा या महोत्सवात उपलब्ध असेल. या महोत्सवामध्ये इंद्रायणी हातसडीचा, इंद्रायणी पॉलिश, दप्तरी, जय श्रीराम, सेंद्रिय ब्लॅक, वाईसार, खुशबू, चिमण साळ, भवाळ्या जिरेसाल या प्रकारच्या जातींचा तांदूळ या महोत्सवामध्ये प्रदर्शन आणि विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. त्याचसोबत अवळाची उत्पादने, विविधप्रकारचे पापड, विविध मसाले, रोस्टेड गहू, नाचणी चे खाद्य पदार्थ, बांबू पासून तयार केलेल्या कलाकृती यासारख्या अनेक गोष्टी या महोत्सवात प्रदर्शन आणि विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

 दिनांक २० मे २०२२ रोजी सकाळी १२.०० वाजता या महोत्सवाचे उद्घाटन अभियानाचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय चे कोकण विभागाचे उपसंचालक श्री. गणेश मुळे, पुणे विद्यार्थी गृह चे संचालक श्री. दिनेश मिसाळ, स्माइल फाउंडेशन च्या श्रीमती उमा धीरज आहुजा इत्यादी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. 

 नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील नागरिकांनी या महोत्सवाला उपस्थिती देऊन दर्जेदार व शुद्ध उत्पादने खरेदी करून ग्रामीण महिलांच्या स्वावलंबनाला हातभार लावण्याचे आवाहन अभियानाच्या उपसंचालक श्रीमती शीतल कदम यांनी केले आहे.