केंद्र सरकारचा उच्च व तंत्रशिक्षणावर भर-एनएमआयएमएसच्या दीक्षांत समारंभ केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन

केंद्र सरकारचा उच्च व तंत्रशिक्षणावर भर-एनएमआयएमएसच्या दीक्षांत समारंभ केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन 



नवी मुंबई, दि. १७ (प्रतिनिधी)  : केंद्र सरकारने तांत्रिक शिक्षणावर भर दिला आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना उद्योजकतेकडे आकर्षित करण्यासाठी भारत सरकारने प्राथमिक शिक्षणात कोडींग आणले असून उच्च व तंत्रशिक्षण महाविद्यालयात जागा वाढविल्या आहेत. सर्वांना आंतरराष्ट्रीय तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये चांगला रोजगार मिळाला आहे. तुमच्या आयुष्यातील हनेक चांगला टप्पा पूर्ण झाला असून दुसरा टप्पा तयार आहे. तुम्ही सर्वजण खऱ्या आयुष्यात लवचिक जीवनाचे साक्षीदार आहात असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. ते एनएमआयएमएस नवी मुंबई कॅम्पसचा दीक्षांत सोहळ्याप्रसंगी बोलत होते. या प्रसंगी विद्यापीठाचे सीईओ मॅकनली सयाजी, असीम श्रीवास्तव, प्राध्यापक सदस्य, बोर्डचे सदस्य, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसह,  कुलपती कर्ता श्री भरत संघवी आणि डॉ. शरद म्हैसकर यांची उपस्थिती आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान यावेळी आठवले यांच्या हस्ते दीक्षांत सोहळ्यात पदवीदान करण्यात आले. कोरोना नंतर तब्बल दोन वर्षानंतर विद्यार्थी एका भव्य सोहळ्यात एकत्र आले होते. यावेळी विद्यार्थी,  शिक्षक, आणि पालकांचा आनंद ओसंडून वाहत होता. 


Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image