पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी मयूर तांबडे

 पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी मयूर तांबडे 


नवीन पनवेल : पनवेल-नवी मुंबई प्रिंट, डिजिटल पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा मयूर गुरुनाथ तांबडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 27 फेब्रुवारी रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मीटिंगमध्ये हा निर्णय घेण्यात आला. सलग दुसऱ्या वर्षी त्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी मयूर तांबडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

        पनवेल येथील लालचंद यादव यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून मयूर तांबडे यांची नियुक्ती करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून दीपक कांबळे, सचिव म्हणून लालचंद यादव तर खजिनदार म्हणून मिलिंद खारपाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पनवेल- नवी मुंबई प्रिंट, डिजिटल पत्रकार संघटना ही सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करते. यापूर्वी संघटनेच्या वतीने गरीब मुलामुलींना 33 सायकलचे वाटप तसेच दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेवेळी स्वागत करणे, धामोळेवाडी येथील मुला मुलींना खाऊ आणि ब्लॅंकेट वाटप करण्यात आले होते. अशाच प्रकारे यापुढे देखील अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतील असे अध्यक्ष मयूर तांबडे यांनी सांगितले. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी सल्लागार रमेश भोळे, अनिल कुरघोडे, अण्णासाहेब आहेर उपस्थित होते. दीपक घरत, दीपक जगे, समीर वेशवीकर, अशोक गोरडे, पंकज तांबडे संघटनेचे सदस्य आहेत.

Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image