शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’

शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा'


पनवेल:
पनवेल तालुक्यातील माेहाे येथील िजल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत १८ वर्षांपूर्वी एकत्र शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली. त्यावेळचेच िशक्षक अािण विद्यार्थ्यांमुळे जणू काही शाळेचा वर्गच पुन्हा भरल्याचा भास सर्वांना झाला.यावेळी िशक्षकांसाेबतचे प्रसंग, बाकांवरच्या मित्र-मैत्रिणींसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
माेहाे येथील िजल्हा परिषदेच्या शाळेत २००१ ते २००६ पर्यंत पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन बुधवारी (ता ०८) पार पडले.
या स्नेहसंमेलनासाठी त्यावेळच्या मुख्याध्यापिका रसाळ मॅडम, िशक्षक िचलवंत सर, ठाकरे सर, िशक्षिका भगत मॅडम, म्हात्रे मॅडम, बावा मॅडम, सावंत मॅडम अावर्जून उपस्थित हाेत्या.
यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देताना शाळेतल्या गंमतीजमती सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी विद्यार्थ्यांशी उपस्थित शिक्षकांनी संवाद साधत माेहाे शाळेतील त्यांच्या अाठवणी पुन्हा जागवल्या.
समाजात वावरताना उत्तम माणूस म्हणून जगा. अडचणीत असलेल्या प्रत्येकाला मदत करण्याचा दृष्टिकाेन कायम ठेवा, असे उपदेशाचे धडे िशक्षकांनी पुन्हा एकदा माजी िवद्यार्थ्यांना िदले.
यावेळी माजी  विद्यार्थ्यांनी िशक्षकांच्या प्रेमाची छडी खात त्यांचे अाशीर्वाद घेतले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेजस, िवकास, परेश, अरविंद, भूषण, नारायण, अमर, अितश, अावनी, अस्मिता, पुजा, श्रद्धा, प्रणाली, िप्रयंका अादी माजी विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.

विद्यार्थ्यांसह शिक्षकही भारावले
शाळेतील सवंगडी, शाळेचा वर्ग, लाकडी बाकडे यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून असते.  शाळा सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकांवर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येतेच. यासाठी अशा स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात यावे, अशी भावना अनेकांनी यावेळी व्यक्त केली.  बऱ्याच वर्षाच्या गाठीभेटीने विद्यार्थ्यांसह शिक्षकही भारावले. सर्वांनी एकमेकांना पुढील वाटचालीसाठी, निरोगी व आरोग्यदायी आनंदी जीवनासाठी शुभेच्छा देवून निरोप घेतला.



Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image