कळंबोलीमध्ये शेकापला जोरदार झटका; शहर संघटक विजय गर्जे भाजपात

 कळंबोलीमध्ये शेकापला जोरदार झटका; शहर संघटक विजय गर्जे भाजपात 



पनवेल (प्रतिनिधी) शेतकरी कामगार पक्षाला कळंबोलीमध्ये जोरदार धक्का बसला असून शेकापचे शहर संघटक विजय गर्जे यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहिर पक्ष प्रवेश केला. पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक बबन मुकादम आणि भाजपचे भटके विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष प्रवेश झाला. या सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वागत करुन त्यांनी जो विश्वास ठेऊन पक्षप्रवेश केला आहे तो सार्थ ठरेल अशी ग्वाही प्रवेशकर्त्यांना दिली.
         पनवेल महापालिका क्षेत्रासह संपुर्ण तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे तसेच नागरीकांना भेडसवणाऱ्या समस्या मार्गी लागत आहेत. त्यांच्या या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन शेकापचे कळंबोली शहर संघटक विजय गर्जे यांच्यासह शुभम पाटील, दिनेश निशाद, धवल भट्ट, सद्दाम शेख, अनीश सिंग, मनींदर सिंग, मनमीत संगेरा, अरनेश मेदी, साहिल पवार, आमीर खान, जतीनंदर सिंग, अमरितपाल सिंग, शुभम विश्वकर्मा, संजय माने, प्रफुल्ल शिंदे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पनवेल येथील निवसस्थानी झालेल्या या पक्षप्रवेशावेळी माजी नगरसेवक बबन मुकादम, भाजपचे भटके विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, भाजपचे उत्तर रायगड उपाध्यक्षा प्रिया मुकादम, आदिनाथ जायभाये, लक्ष्मण जायभाय, दिनकर बडे, भाजपचे कळंबोली शहर चिटणीस मनीष तिवारी, मन्सूर पटेल आदी उपस्थित होते.

Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image