खारघरच्या मदरहुड हॉस्पिटल्समध्ये बालदिन मोठया उत्साहात साजरा

खारघरच्या मदरहुड हॉस्पिटल्समध्ये बालदिन मोठया उत्साहात साजरा


*मोफत आरोग्य तपासणी, मनोरंजनात्मक खेळ,जादुचे प्रयोग आणि भेटवस्तूंची लयलूट*


*नवी मुंबई* : खारघरच्या मदरहूड हॉस्पिटल्स येथे बाल दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बाल आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करत याठिकाणी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ब्युटीफुल टुमॉरो फाउंडेशन आणि एस.एच. दिव्यांग शाळा यांच्या सहयकार्याने बालदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात 56 हून अधिक मुले आणि त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश होता. या उपक्रमातंर्गत अत्यावश्यक आरोग्य तपासण्यांबरोबरच विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुलांची शारीरीक वाढ आणि त्यांच्या सर्वांगीण आरोग्याचे मूल्यमापन करण्यात आले.

हल्ली बदलत्या जीवनशैलीशी बरोबरच आरोग्य समस्यांमध्येही वाढ होत आहे. लठ्ठपणा, इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता, स्वयंप्रतिकार रोग आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या दिवसेंदिवस चिंताजनक ठरल्या आहेत. बैठी जीवनशैली, आहाराच्या चूकीच्या सवयी आणि वाढता स्क्रीन टाईम यासारखे घटक यास कारणीभूत ठरतात. याकरिता वेळीच निदान व प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे.

मदरहुड हॉस्पिटलमध्ये आम्ही प्रत्येक मुलाचे आरोग्य  चांगले रहावे यासाठी प्रयत्नशील असतो. *डॉ. अनिश पिल्लई(नवजात शिशू व बालरोग तज्ज्ञ,मदरहुड हॉस्पिटल) सांगतात की,* या कार्यक्रमात मोफत आरोग्य तपासणीसह याठिकाणी उपस्थित कार्टून्स, जादुचे प्रयोग आणि मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी मुलांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहण्याजोगा होता.

डॉ. पिल्लई पुढे सांगतात की, ही लहान मुले हे आपल्या देशाचे भविष्य असून त्यांची शारीरीक वाढ आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य सुविधा पुरवणे गरजेचे आहे. प्रत्येक बालकाला निरोगी जीवन जगण्यासाठी उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा मिळविण्याचा अधिकार आहे.

*मदरहूड हॉस्पिटलच्या फॅसिलिटी डायरेक्टर डॉ. रुपाली सुनील कदम सांगतात की,* जीवनशैलीशी संबंधित आरोग्य समस्यांमध्ये वाढ हे प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित करते. आम्ही पालकांना नियमित तपासणीचे महत्त्व पटवून देतो तसेच आणि निरोगी जीवनशैलीची निवड करण्याचा आग्रह करतो. मुलांना निरोगी जीवन जगता यावे यासाठी खरोखरच जागरुकतेची आवश्यकता आहे.

याठिकाणी उपस्थित मुलांनी केक कापला व या मुलांना खास भेटवस्तू देण्यात आल्या. या मुलांनी त्यांच्या आवडत्या गाण्यांवर नृत्य करत, खेळाचा आनंद लूटत या कार्यक्रमाचा आनंद लूटला.

*मनीषा पी. ठाकरे(ब्युटीफुल टुमारो फाउंडेशन, एसएच दिव्यांग केंद्राच्या प्राचार्या) सांगतात की,* हा बालदिन सोहळ्याचे आयोजित करत मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी  राबविलेल्या विविध उपक्रमांसाठी आम्ही खारघरच्या मदरहूड हॉस्पिटलचे कौतुक करतो. आमच्या विद्यार्थ्यांसाठी हा सोहळा अतिशय आनंददायी ठरला आणि याठिकाणी मुलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली असून यासाठी रुग्णालयाचे विशेष आभार मानते. आमच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम राबविले जातील अशी अपेक्षा करतो.

Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image