शेतकरी कामगार पक्षात पक्षप्रवेशाची लाट, प्रीतम म्हात्रे यांचा जलवा

 शेतकरी कामगार पक्षात पक्षप्रवेशाची लाट, प्रीतम म्हात्रे यांचा जलवा 


उरण : प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकापमध्ये पक्षप्रवेशाची लाट उसळली आहे. चौक जवळील तीनघर येथील तरुणांनी शिवसेनेतून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. प्रणित जाधव, प्रतीक धानिवले, हर्ष मोरे, रोहित गरुडे, राजेश पाटील यांनी शेकापमध्ये जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायणशेठ घरत, जे एम म्हात्रे इन्फ्रा प्रोजेक्टचे संचालक विपुल म्हात्रे, शेकापक्षाचे पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र पाटील, सावळे विभाग अध्यक्ष भास्कर गाताडे, शेकाप कार्यकर्ते विलास गवंडी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

          शेतकरी कामगार पक्षामध्ये पक्षप्रवेशाची लाट उसळली असून प्रीतम म्हात्रे यांनी आपला जलवा दाखवला आहे. शेकाप मध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. केळवणे जिल्हा परिषद मतदार संघातील जांभिवली ग्रामपंचायत मधील कराडे बुद्रुक येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य वेदिका विनोद जाईलकर त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा सरचिटणीस विनोद अरविंद जाईलकर, भारतीय जनता पार्टीचे माजी ग्रामपंचायत सदस्य विलास बाळकृष्ण शिर्के, युवा कार्यकर्ते गणेश मापनकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बुधवारी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या 
 समितीचे सदस्य आणि ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायणशेठ घरत, पुरोगामी व संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष देवेंद्र पाटील, सरपंच, ज्ञानेश्वर कोंडीलकर, कर्नाळा ग्रामपंचायतचे सरपंच साबीर दळवी, विकास रायकर माजी उपसरपंच, कृष्णा शिर्के इत्यादी मान्यवर उपस्थित होते.  वाशिवली (वडगाव) येथील विजय अनंत शिंदे, रमेश रामचंद्र भोईर, ज्ञानेश चंद्रकांत शिंदे, अनंत नथू शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला.
Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image