आपण न केलेल्या कामाचे श्रेय घ्यायची पण याना लाज वाटत नाही-प्रितम म्हात्रे यांचा घणाघात

आपण न केलेल्या कामाचे श्रेय घ्यायची पण याना लाज वाटत नाही-प्रितम म्हात्रे यांचा घणाघात


उरण : 190 उरण विधानसभा मतदार संघात गेल्या पाच वर्षात काडीचेही काम झाले नाही त्यामुळे विकासाची वाट पाहणाऱ्या उरणच्या जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे उरण तालुक्याचा हा मागे पडलेला विकासाचा अनुशेष भरून काढून तरूणाना इथेच सन्मानजनक रोजगार मिळवून देण्याचा प्रितमदादा म्हाञे यांचा मानस आहे. त्यासाठी आपण येत्या 20 तारखेला प्रितम दादाना प्रचंड मतानी निवडून देवून तालुक्याला लागलेला कलंक धुवून काढा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष  महेश साळुंखे यानी दादरपाडा येथे भव्य रॅलीला मार्गदर्शन करताना केले.

           उरण विधानसभा मतदार संघाचे शेकापचे उमेदवार प्रितमदादा म्हाञे यानी उरण तालुक्यातील गावाचा दौरा करून तेथील मतदाराच्या गाठीभेटी घेतल्या. त्यावेळी वेश्वी दादरपाडा येथे कार्यकर्त्याना ते मार्गदर्शनपर बोलत होते. यावेळी उरण तालुक्यातील शेकापचे प्रमुख नेते महादेव बंडा, फुंडे गावचे सरपंच बिल्लाशेठ, युवानेते रमाकांत म्हाञे, मयुर भोईर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात साळुंखे पुढे म्हणाले हे माझे आणि प्रितमदादाचे मामाचे गाव आहे. त्यामुळे आम्ही आपल्याला मताची विनंती नाही तर हक्काने सांगायला आलो आहोत तुम्ही आमचे स्वागत एवढे उत्स्फुर्त केले आहे की तुम्हाला आम्ही सांगण्याची गरज नाही परंतु आपल्याला हा विजय एवढा मोठा करायचा आहे की येथील आगरी, कोळी, आदीवासी बांधधवाचा अपमान करणार्याना कायमची आठवण राहिली पाहिजे. 
    यावेळी बोलताना प्रितम जे एम म्हाञे म्हणाले की आता पुर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही. तरूण शिकला आहे परंतु केवळ नोकरी अभावी तो मागे पडत आहे. या तरूणाना नोकरी मिळावी यासाठी आपण मोफत प्रशिक्षण सुरू केले असून त्यातून 44 तरूणाना एअर पोर्टवर नोकरी मिळवून देण्यात यशस्वी झालो आहे. उद्याच्या भविष्यात अशाच पध्दतीने काम करून हजारो -लाखो तरूणाना नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. येथील आमदारानी तालुक्यात काहीच काम केले नसल्याने तो आता केंद्र सरकारचे मोठमोठे प्रकल्पाची कामे आपणच केल्याचे सांगत आहे. आपण न केलेल्या कामाचे श्रेय घ्यायची पण याना लाज वाटत नाही. या भागातील सिडकोचा प्रश्न गंभीर आहे तो सोडविण्याची ताकद फक्त शेकापमध्येच आहे. मध्यस्थी करून दलाली लाटणाऱ्याना आता घरचा रस्ता दाखवून आपण आपल्यातल्या माणसाला संधी देणे काळाची गरज बनली आहे. येत्या 20 तारखेला शिट्टीच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण आपल्या विकासाचा महामार्ग प्रशस्त करायचा आहे आणि मला निवडून द्या असे आवाहन प्रीतम जे एम म्हात्रे यांनी केले. 

नोकरभरती संदर्भात जेएनपीटीमध्ये जे झाले ते विमानतळमध्ये होऊ नये यासाठी प्रितम म्हात्रे आमदार होणे गरजेचे- रमाकांत म्हात्रे, युवक अध्यक्ष उरण तालुका 
उरण: लोकनेते दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ थोड्याच दिवसांत सुरू होणार आहे. याठिकाणी २५ हजारपेक्षा जास्त नोकर भरती आणि रोजगार उपलब्ध होणार आहे, तो इथल्या स्थानिकांनाच मिळाला पाहिजे यासाठी या मातीतला आणि भूमिपुत्रांसाठी आवाज उठवणारा लोकप्रतिनिधी म्हणून प्रितम जे एम म्हात्रे यांनाच निवडून देण्याचे आवाहन उरण तालुका युवक अध्यक्ष रमाकांत म्हात्रे यांनी केले आहे. 
        उदाहरण देताना रमाकांत म्हात्रे यांनी सांगितले की, जेएनपीटी मध्ये एक ३५० मीटरची जेट्टी आहे. त्याठिकाणी ३००-३५० कामगार काम करतात त्यात एक ही इथला स्थानिक नसून सर्व गुजरात वरून आलेले आहेत. तिथले आमदार, खासदार, मंत्री आपला मतदारसंघ शाबूत ठेवण्यासाठी तिथल्या तरुणांना याठिकाणी रोजगार देण्याचा प्रयत्न करतात. याला आपल्या लोकप्रतिनिधीने विरोध करून तो रोजगार इथल्याच भूमिपुत्राला मिळावा म्हणून प्रयत्न करायला पाहिजे पण दोन्ही ठिकाणी भाजपची सत्ता असल्याने तेरी भी चुप मेरी भी चुप अशा पद्धतीने स्थानिकांवर अन्याय होत आहे. दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळात सुद्धा देशपातळीवरील भाजपचे नेते आप आपल्या मतदारसंघातील तरूण याठिकाणी नोकरीसाठी पाठवून इथल्या स्थानिकांचा हक्काचा रोजगार आणि नोकरी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला जाईल, तो हक्काचा रोजगार आणि नोकरी इथल्याच भूमिपुत्राला मिळावी म्हणून स्थानिक उमेदवार प्रितम जे एम म्हात्रे यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन रमाकांत म्हात्रे यांनी केले आहे. 

Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image