रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटी आयोजित खेळ पैठणीच्या खेळात शेवंताची उपस्थिती !

 रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटी आयोजित खेळ पैठणीच्या खेळात शेवंताची उपस्थिती !



उरण दि ७(विठ्ठल ममताबादे )
यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर व रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या सौजन्याने आयोजित उलवे नोड येथील नवरात्र उत्सवात दिनांक ६ ऑक्टोबर रोजी महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या खेळात शंभराहून अधिक महिलांनी सहभाग घेतला. खेळ पैठणीचा खेळात मुख्य आकर्षक होते रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर यांची उपस्थिती होती.अपूर्वा नेमळेकर फक्त उपस्थित राहिल्या नाहीत तर त्यांनी गरबा नृत्याचा आस्वाद घेतला व ठेका धरला. त्यांच्या सहभागाने महिलांचा उत्साह द्विगुणीत झाला. त्यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाच्या पैठणीच्या मानकरी मोनाली भिलारे, द्वितीय क्रमांक पायल घाडगे, तृतीय क्रमांक  संचिता कोळी तर चतुर्थ क्रमांकाच्या मानकरी छाया शेट्टी यांना मानाच्या पैठण्या देण्यात आल्या.तर लकी ड्रॉ द्वारे चार भाग्यवान महिलांना सेमी पैठण्या देण्यात आल्या. काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या संस्थेमार्फत अतिशय सुरेख कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.उलवे नोड मधील महिला वर्ग पावसाची तमा न बाळगता या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image