यशश्री शिंदे आणि अक्षता म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी पनवेलमध्ये काढण्यात आला आक्रोश मोर्चा
पनवेल : उरण येथील यशश्री शिंदे आणि नवी मुंबई येथील अक्षता म्हात्रे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी 29 जुलै रोजी पनवेलमध्ये सर्वपक्षीय तसेच समाजातील विविध सामाजिक संघटना तसेच शालेय विद्यार्थींनी यांनी एकत्रित येवून आक्रोश मोर्चा काढला. यावेळी या दोन्ही घटनांमधील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी असे निवेदन प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले. पाऊस पडत असताना देखील पावसाची तमा न बाळगता मोर्चा सावरकर चौकातून प्रांत कार्यालयावर नेण्यात आला.