बांठिया हायस्कूल येथे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन

 बांठिया हायस्कूल येथे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन

माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संखेने सहभागी व्हावेमाजी विद्यार्थी समन्वय समितीचे आवाहन

 


पनवेल( प्रतिनिधी) नवीन पनवेल येथील  सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केशरचंदजी आनंदरामजी बांठिया माध्यमिक विद्यालय तसेच एनएन. पालीवाला कनिष्ट महाविद्यालयामध्ये १९८३ पासून आजपर्यंत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांसाठी रविवारदिनांक ५ मे २०२४ रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजे पर्यंत सेक्टर १८नवीन पनवेल येथील बांठिया हायस्कूलच्या  विद्यासंकुलातील वातानुकुलीत साभगृहात  माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन माजी विद्यार्थी समन्वय समितीने केले आहे.

              शाळेत ज्ञान दानाचे महत्कार्य केलेल्या माजी मुख्याध्यापकशिक्षकप्राध्यापक आणि मान्यवरांचा हृद्यसत्कार या माजी विद्यार्थी मेळाव्यात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर  स्मरणिका प्रकाशनखेळमानवतेवर आधारित नाटिका,  करमणुकीचे सांस्कृतिक  कार्यक्रमस्नेहभोजन या कार्यक्रमासोबतच ग्रुप फोटो आणि सेल्फी साठी स्टॅन्ड उभारण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी २५ माजी विद्यार्थ्यांची समन्वय समिती गठीत केली असून सर्व स्वयंसेवक विविध जबाबदाऱ्या पार पडत आहेत. या नियोजित कार्यक्रमात उपस्थिती साठी अजूनही ज्यांनी नोंदणी केली नाही अशा माजी विद्यार्थ्यांनी समितीचे प्रमुख रमेश यादव ९८७०२१७०७०, विनोद वाघमारे ९७०२५८०५०५तुषार देशपांडे ९७६९६१३६८४अमर शेळके ८६५२१२६००६, स्नेहा पाटील ९००२९२९७२८४मधुरा  तायडे ९९६७५९६००७श्रीकांत म्हात्रे ७६६९५५५७७  यांच्याशी संपर्क साधावा  अशी माहिती समन्वय समितीने दिली.

              शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठीनोकरी धंद्यासाठी किंवा इतर कारणासाठी दूर गेलेल्या आपल्या वर्ग मित्रांना पुन्हा एकदा या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने भेटता येणार आहे. आपल्याला माणूस म्हणून जगण्यासाठी शिक्षणासोबतच खेळभावनाशिस्तआदरमाणुसकीही शिकवली त्या आदर्श माजी शिक्षकांचे आशीर्वाद घेण्यासाठी या मनोमिलनाच्यामैत्रीच्यामाजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात मोठ्या संखेने उपस्थित राहावे  असे आवाहन के. आ. बांठिया हायस्कूल माजी विद्यार्थी समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

 


Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image