आयुष्यात शिकण्यासारखे प्रचंड- डॉ.प्रदीप कामथेकर
प्रत्येक विद्यार्थ्याने उत्तुंग उद्दिष्ट ठेवले पाहिजे - लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल(प्रतिनिधी) शिक्षण कधीही वाया जात नाही आणि मानवी जीवनात शिक्षणाचे महत्व अधिक आहे, त्यामुळे आयुष्यात शिकण्यासारखे प्रचंड आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे वित्त आणि लेखाधिकारी सी.ए. डॉ.प्रदीप कामथेकर यांनी खांदा कॉलनी येथे आज (दि. १३) केले.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सा
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमोल उपस्थित होत्या. या प्रसंगी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख,पनवेल महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर सीता पाटील, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य संजय भगत, पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका हेमलता म्हात्रे, संस्थेचे सचिव मा. डॉ. एस. टी. गडदे, प्राचार्य डॉ. एस. के. पा
स्वर्गीय चांगु काना ठाकूर यांचे पुण्य स्मरण आणि त्यांच्या आदर्श विचारांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी आयोजिलेल्या कौतुक सोहळ्यामध्ये पारितोषिक प्राप्त विध्यार्थ्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
डॉ.प्रदीप कामथेकर यांनी, “माणसाने आयुष्यात नेहमी सक्रिय विद्यार्थी बनून सातत्याने अभ्यास करत ज्ञानसंपादन केले पाहिजे. असे सांगतानाच १०० टक्के प्रयत्न म्हणजेच यशाची खात्री असते, असे अधोरेखित केले. तसेच आई वडिलांचे ऋण लक्षात ठेविले पाहिजे, असेही नमूद केले.
यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अध्यक्षीय भाषणात पारितोषिक प्राप्त विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रत्येक विद्यार्थ्याने उत्तुंग उद्दिष्ट ठेवले पाहिजे असे नमूद करत त्यांना पुढील वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यामध्ये सर्व पालक व गुणवंत विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे