काव्यांगण साहित्य मंच तथा बहुउद्देशीय संस्था शाखा पुणे यांनी श्री. अंकुश नथुराम जाधव, (निवी रोहा) यांना महात्मा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले

काव्यांगण साहित्य मंच तथा बहुउद्देशीय संस्था शाखा पुणे यांनी श्री. अंकुश नथुराम जाधव, (निवी रोहा) यांना महात्मा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले



कळंबोली (प्रतिनिधी)-  दिनांक 17एप्रिल2022 रोजी  पुणे येथे आयोजित 3 रे सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय काव्य संमेलनात  श्री अंकुश नथुराम जाधव यांना  राज्यस्तरीय  आदर्शशिक्षक पुरस्कार मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.त्यावेळी त्यांची पत्नी सौ अवंतिका जाधव,मुले प्रथम -प्रथमेश त्यांच्या समवेत होते 

अंकुश जाधव हे,शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री सतीश मोहन पाटील यांच्या " न्यू इंग्लिश स्कूल कळंबोली " विद्यालयात गेली १६ वर्षे कार्यरत  आहेत.विविध संस्थांकडून  आजमितीला 11 वेळा " आदर्श शिक्षक पुरस्काराने " सन्मानित करण्यात आले आहे .

       अंकुश जाधव हे एक दिव्यांग शिक्षक असून अत्यंत बुद्धिमान , प्रामाणिक, कष्टाळू व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, संस्कृती कार्य खरोखरच उल्लेखनीय,  प्रशन्सनीय  आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अनेक सामाजिक संस्थांनी आदर्श शिक्षक पुरस्कारानी त्यांना गौरवीले आहे.आज  त्यांच्या शैक्षणिक, प्रशासकीय, गुणवत्तापूर्ण सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल व शाळेतील विविध उपक्रमांची दखल घेऊन   काव्यांगण साहित्य मंच तथा बहुउद्देशीय संस्था शाखा पुणेसमितीच्या  वतीने त्यांना राज्यस्तरीय  आदर्श शिक्षक  पुरस्काराने गौरविले. 

      त्यांच्या  नावावर आजपर्यंत आदर्श शिक्षक, वृक्षमित्र, काव्यभूषण, ज्ञानभूषण, समाजरत्न, शिक्षकरत्न, कविभूषण, समाजभूषण ,उत्कृष्ट निवेदक असे अनेक पुरस्कार आहेत. याची विश्वासहर्ता तपासायची असल्यास त्यांचे फेसबुक अकाऊंट फॉलो करा.हा पुरस्कार त्यांच्या गुणगौरवात मानाचा शिरपेच चढवतो.

        संमेलनाध्यक्ष मा.महापौर श्री.राहुलदादा जाधव,श्री. निलेश बोराडे,श्री.निखिल बोराडे,उद्धघाटक सौ.शामलताई पंडित, कवी संमेलनाध्यक्ष मा अनिल दीक्षित सर, पुणे जिल्हाध्यक्षा सौ सुनीता पडवळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीणाताई व्होरा यांनी केले.राज्यस्तरीय कविसंमेलन, काव्यांगण पब्लिकेशन उद्धघाटन तसेच पुस्तक प्रकाशन सोहळा, संपादक/अध्यक्ष श्री राजू पाडेकर, कवयित्री प्रांजली काळबोंडे,कवी नीरज आत्राम सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.जाधव हे त्यांच्या उत्कृष्ट अध्यापन शैलीने  विद्यार्थीवर्गात प्रिय शिक्षक आहेत.

       आज त्यांच्यावर सर्व स्थरातून,आणि सहकारी अध्यापक वृंद यांनी विशेष अभिनंदन केले त्यांचे लाडके विद्यार्थी, पालक, मित्र परिवार, निवी ग्रामस्थ, नातेवाईक यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे . कौतुक होत आहे. त्यांच्या भावी कार्यास भरभरून शुभेच्छा देत आहेत.सलाम त्यांच्या कार्याला आणि त्यांचा गुणगौरव करणाऱ्या "काव्यंगण साहित्य मंच तथा बहुद्द्देशीय संस्था   " .

 त्यांच्या पुढील वाटचालीस आमच्याकडूनही हार्दिक शुभेच्छा!