पनवेलमध्ये प्रथमच सप्तपदी वेडींग ज्वेलरी कलेक्शनच्या माध्यमातून रॅम्प वॉक ; बी.बी.बांठीया ज्वेलर्स अनोख्या उपक्रमाने जिंकली पनवेलकरांची मने
पनवेल, दि.28 (संजय कदम) ः पनवेलमध्ये प्रथमच सप्तपदी वेडींग ज्वेलरी कलेक्शनच्या माध्यमातून नामांकित अशा तरुण व तरुणी वर्ग रॅम्प वॉक करणार असून शहरातील सुप्रसिद्ध बी.बी.बांठीया ज्वेलर्स यांच्या माध्यमातून हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला होता. यामुळे त्यांनी पनवेलकरांची मने जिंकली आहेत.
7 पिढ्यांच्या दागिन्यांची हौस भागवणारे बी बी बांठिया ज्वेलर्स हे रायगड जिल्ह्यात खात्रीशीर दागिन्यांचे व्यापारी म्हणून सुपरिचित आहेत. रायगड जिल्ह्यात प्रथमच या प्रकारच्या ज्वेलरी फॅशन शो चे आयोजन आले होते. त्यामुळे पनवेल, उरण सह नवी मुंबई व रायगड परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता दिसुन आली. हल्लीच्या जमान्यात ग्राहक चोखंदळ झाला असून पूर्वीसारखे कॅटलॉग बघून दागिन्यांची खरेदी होत नाही. ग्राहकांनी हटके आणि निरनिराळ्या पद्धतीची डिझाईन्स डोळ्यासमोर पाहायला आवडतात. ग्राहकांची हीच गरज ध्यानात ठेऊन आम्ही अत्यंत आकर्षक पद्धतीने भारतातील निरनिराळ्या ठिकाणी प्रसिद्ध असलेली वेडिंग डिझाईन्स तयार केली आहेत. ती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. या ज्वेलरी फॅशन शो चे नियोजन अथर्व मीडिया वर्ल्ड चे सर्वेसर्वा मिलिंद राणे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आले. प्रसिद्ध फॅशन शो दिग्दर्शक यश शेलार यांनी हे फॅशन शो साठी दिग्दर्शन केले. तसेच या दागिन्यांची घडणावळ ज्वेलरी कन्सल्टंट नवीन सदारंगानी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती. कोरोना प्रतिबंधक निर्बंध अद्यापही काही प्रमाणात लागू असल्याने मर्यादित प्रेक्षकांना प्रवेश दिला गेला होता. उपस्थित मान्यवरांचे स्वागत राजेश बांठिया यांच्यासमवेत गौरव बांठिया, वैभव बांठिया, सुयोग बांठिया आदींनी केले. यानिमित्ताने पनवेल शहरातील यशस्वी उद्योजक व सभागृह नेते परेश ठाकूर, यशस्वी उद्योजक व विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, उद्योजक व नगरसेवक राजू सोनी, सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे व अॅड.मनोहर पाटील यांना जेम्स ऑफ पनवेल हा अॅवॉर्ड देवून भुषविण्यात आले. त्याचप्रमाणे इतर मान्यवरांना सुद्धा विविध अॅवॉर्ड देवून गौरविण्यात आले. अनेक नामांकित अशा मॉडेल यांनी यावेळी विविध दागिन्यांनी नटून रॅम्प वॉक केला व पनवेलकरांची मने जिंकली. अशा प्रकारच्या उपक्रमामुळे अनेक तरुण व तरुणींना एक वेगळ्या क्षेत्रात वाव मिळाला आहे. अशा प्रकारचे आयोजन यापुढे सुद्धा करण्यात येईल अशी माहिती अथर्व ग्राफीक्सचे मिलींद राणे यांनी यावेळी दिली.