इंग्रजी नामांकित शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया तात्काळ चालू करा! आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्यावतीने शासन स्तरावर दिले निवेदन

इंग्रजी नामांकित शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया तात्काळ चालू करा! आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्यावतीने शासन स्तरावर दिले निवेदन

आदिवासी समाजातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले, त्यास जबाबदार कोण? - अध्यक्ष, गणपत वारगडा 


पनवेल/ प्रतिनिधी :

     आदिवासी समाजातील विद्यार्थी चांगल्या प्रकारचे व इंग्रजी नामांकित शाळांमध्ये शिक्षण घ्यावे हे शासनाचे धोरण होते. या धोरणेप्रमाणे काही वर्षांपासून आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राज्यभर इंग्रजी नामांकित शाळा सुरू केल्या. त्यामुळे आदिवासी समाजातील पालक व विद्यार्थ्यांमध्ये नामांकित शाळांची आवड निर्माण झाली. एका बाजूला नामांकित शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया जोरात चालू झाली, तर दुस-या बाजूला आदिवासी आश्रमाशाळा ओसाड पडू लागल्या. आदिवासी विद्यार्थी इंग्रजी नामांकित शाळांमध्ये शिक्षण घेवून मोठा अधिकारी होतील असे स्वप्न समाजातील कार्यकर्त्यांना वाटू लागले. 

    माञ, गेल्या दोन वर्षापासून कोवीड- १९ चे कारण दाखवून आदिवासी विकास विभागाने इंग्रजी नामांकित शाळांमध्ये प्रवेश प्रक्रियाच थांबविले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा, शासकीय व निम्म शासकीय शाळा तसेच आर.टी.ई. अंतर्गत विद्यार्थ्यांचे प्रवेश त्या- त्या शाळांमध्ये झाल्याचे दिसून येते. परंतु, आदिवासी विकास विभागाने इंग्रजी नामांकित शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया चालू का करण्यात आली नाही? आदिवासी विकास विभागाने काही वर्षांपासून इयत्ता १ ली व २ री इयत्तेमध्ये क्रमा- क्रमानुसरा प्रवेश दिले, परंतु, दोन वर्षापासून इयत्ता १ ली व २ री इयत्तेमध्ये प्रवेश का झाले नाहीत? त्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षांच्या नुकसानीला जबाबदारी कोण?? यासारखे प्रश्न निर्माण झाले आहेत. आदिवासी अडाणी, अशिक्षीत बांधवांची शासनांकडून फसवणूक होत असल्याचे दिसून येते. यादर्भात आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष गणपत वारगडा यांनी आदिवासी विकास विभाग ठाणे येथील मा. अप्पर आयुक्त यांना प्रकल्प अधिकारी श्रीमती. आहिरराव यांच्या मार्फत निवेदन दिले आहे. जर इंग्रजी नामांकित शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया तात्काळ सुरू झाली नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचे सुध्दा इशारा गणपत वारगडा यांनी दिला आहे.




Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image