झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन आमदार प्रशांत ठाकूर हेच करणार - पत्रकार शंकर वायदंडे

झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन आमदार प्रशांत ठाकूर हेच करणार - पत्रकार शंकर वायदंडे 



पनवेल (प्रतिनिधी) आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्वसामान्य माणसाची जाण आहे, झोपड्पट्टीवासियांच्या हितासाठी त्यांनी मागणी आणि त्या अनुषंगाने पाठपुरावा कायम ठेवला आहे, त्यामुळे झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन आमदार प्रशांत ठाकूर हेच करणार आहेत, असा ठाम विश्वास नवीन पनवेल पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पत्रकार शंकर वायदंडे यांनी व्यक्त केला.      
        पत्रकार शंकर वायदंडे यांनी झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत मत व्यक्त करताना म्हंटले कि, एसआरए अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण  मुंबई मधील झोपडपट्टी पुनर्वसन साठी १९९५ ला स्थापना झाली.  बृहन्मुंबई महानगरपालिका परिसरातील उपनगरे, ठाणे, कल्याण, विरार, बदलापूर आणि पनवेल यांना ही लागू केली पनवेलला २०२० साली एसआरए लागू झाली असून प्रत्यक्ष पनवेल ची झोपडपट्ट्या भूखंडाची परिस्थिती पाहता काही खाजगी मालकी, सिडको, रेल्वे, पालिका, एमआयडीसी आदी भूखंडावर झोपडपट्ट्या आहेत. एसआरए लागू होण्यासाठी ५१ टक्के पेक्षा जास्त लोकांनी योजनेत संमत होणे, भूखंड मालकाचे संमती, विकासक नेमणे अशा अटी आहेत.  मुळात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी एकही झोपडीला बेघर होऊ देणार नाही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वांना परवडेल अशी घरे देण्याची घोषणा केली आहे आणि तशी मागणी आणि सातत्याने ते पाठपुरावा करत आहेत. असे असताना काही शेकाप पुरस्कृत माजी नगरसेवक व नेत्यांनी एसआरएचा घाट घातला असल्याचे पत्रकार शंकर वायदंडे यांनी लक्षात आणून दिले असून मुळात त्याला ५१ % लोक सहमत होणार नाहीत तसेच भूखंडावरील जागा मालकाची सहमती मिळणे शक्यता कमी आहे आणि  सिडको हद्दीतील पंचशील नगर, नवनाथ नगर या झोपड्यांचे भूखंड विकास आराखड्यानुसार रेल्वेला दिला आहे त्यामुळे पंचशील नगर व नवनाथ नगर या झोपडपट्टीचे पुनर्वसन साठी सिडको संमती देईल का ? असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.                एसआरए योजनेच्या अनुषंगाने सन २००० पर्यंतच्या झोपड्यांना मोफत तर २०१० पर्यंतच्या झोपड्यांना सशुल्क २ लाख ५० हजार भरून घरे देणार तर २०१० नंतरच्या झोपड्यांना अपात्र ठरवून पुन्हा बेघर होण्याची वेळ येईल. तसे होऊ नये यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व बांधवांना आश्वासित केल्याप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजना सोबत महाराष्ट्र शासन व पालिका मिळून पुनर्वसन योजना आखणी केली आहे. आणि त्याचबरोबरीने प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सर्वेक्षणाचे काम देखील सुरु आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्वसामान्य माणसाची जाण आहे त्यामुळे त्यांनी या विषयी झोपड्पट्टीवासीयांसोबत बैठका घेऊन त्यांच्या सूचनाही ऐकून घेत त्या संदर्भात कार्यवाहीसाठी आयुक्त मंगेश चितळे यांच्यासोबत बैठक घेतली. आणि पुढील कार्यवाहीला वेग दिला आहे.  त्यामुळे घरांच्या संदर्भात दिशाभूल करण्यापासून झोपडपट्टी वासियांनी सावध रहावे, असे आवाहन करतानाच झोपडपट्टी पुनर्वसनसाठी आमदार प्रशांत ठाकूर अग्रेसर असून त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवावा आणि सर्वांनी आपल्या हक्कासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत रहावे, असेही आवाहन पत्रकार शंकर वायदंडे यांनी केले.

Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image