खारघर शहरातील पाणीटंचाई बाबत मा.नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांचा सिडकोला आंदोलनाचा इशारा

खारघर शहरातील पाणीटंचाई बाबत मा.नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांचा सिडकोला आंदोलनाचा इशारा 

खारघर/प्रतिनिधी दि.१२

खारघर शहरातील बहुतांश सेक्टरमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. जवळपास सर्वच सेक्टरमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांची भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी विविध सेक्टर मधील नागरिकांसह भेट घेतली व त्यांना खारघर शहरातील होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठा बाबत तसेच तीव्र पाणीटंचाई बाबत कल्पना दिली.उन्हाळ्याची सुरुवात झालेली असून मागील अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.खारघर शहरातील सेक्टर ११,१३,१९,२० व २१ तसेच खारघर व मुरबी गाव या ठीकाणी पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे. वेळोवेळी सिडकोला अनेक सोसायट्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु सिडको प्रशासनाकडून कुठलीही ठोस उपाययोजना आतापर्यंत करण्यात आली नसल्यामुळे सोसायटीतील नागरिक त्रस्त झाले आहेत. सेक्टर 19 तसेच सेक्टर 21 या दोन्ही सेक्टर मधील काही सोसायट्यांना पाणीपुरवठा हा नेहमीच म्हणजे वर्षभर कमी दाबाने होत असतो. याबाबतीत कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग सिडको यांना कल्पना देऊन देखील कुठलीही उपाययोजना करण्यात आली नसल्याचे सदर सोसायटीतील नागरिकांची तक्रार आहे. नुकताच मार्च महिना सुरू झाला आहे मागील आठवड्याभरापासून काही ना काही कारणाने सिडकोचे पाणी एक तर कमी दाबाने येत आहे किंवा येतच नाही त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. संपूर्ण उन्हाळा अजून जायचा आहे व आत्तापासूनच नागरिकांना प्रायव्हेट पाण्याचे टँकर मागवावे लागत आहेत व त्याचा आर्थिक भार त्यांना सहन होण्यासारखा नाही. रहिवाशी असा देखील आरोप करत आहेत की सिडको फक्त घरांचे निर्माण करत आहेत त्यासाठी लागणारे पाणी कुठून आणणार असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे.असेही या तक्रारीत म्हटले आहे.

याबाबतीत लवकरात लवकर योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी सर्व रहिवाशांच्या वतीने सिडको प्रशासनाला विनंती करण्यात आली. श्री गणेश देशमुख सह व्यवस्थापकीय संचालक सिडको यांनी नागरिकांना आश्वासित केले की लवकरच बाळगंगा धरणाचा महत्त्वपूर्ण टप्पा पार पडल्यानंतर सर्वांनाच मुबलक प्रमाणात पाणी मिळेल. तसेच न्हावा सेवा टप्पा ३ ची पाईपलाईन देखील लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सिडको प्रशासन प्रयत्न करत आहे. रहिवाशांनी सिडको व्यवस्थापनाला त्यांच्या रोजच्या होणाऱ्या त्रासातून मुक्तता व्हावी अशी विनंती केली. भाजपा खारघर मंडल उपाध्यक्ष किरण पाटील यांनी सिडको प्रशासनाला सांगितले की आपण पाण्याचा प्रश्न गंभीरतेने घ्यावा अन्यथा पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली प्रश्न मार्गी न लागल्यास सिडको वर मोर्चा काढण्यात येईल अथवा जन आंदोलन छेडण्यात येईल. आजच्या बैठकीत भाजपा ज्येष्ठ नेते दिलीप जाधव, जयवंतराव पाटील, सावित्री राव, शुभलक्ष्मी शिवाकुमार,शैलेंद्र शेजवळ, डॉ.स्वामीनाथ ढवळे, शशी कुमार,भूषण मुळे,भाजपा उद्योग आघाडीचे संयोजक भरत कोंढाळकर, भाजपा युवा मोर्चा सचिव आदित्य हातगे, प्रशांत पाटील यासह नागरिक उपस्थित होते.


Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image