मतदारांचा विश्वास सार्थ ठरवू, प्रितमदादा म्हाञे
उरण : उरण विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदाराच्या नाकर्तेपणामुळे तालुक्याचा विकास रखडला असून या तालुक्याला पुन्हा विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मतदाराचा विश्वास सार्थ ठरवू असे प्रतिपादन प्रितम जे एम म्हाञे यानी केले. विधानसभा निवडणूक प्रचारार्थ पागोटे येथे प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी बंडाशेठ, जितेंद्र म्हात्रे, रमाकांत म्हाञे, शिपाजी काळे, महेश साळुंखे आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रितमदादा म्हात्रे म्हणाले की पागोटे क्रातीवीरांची भुमी आहे, माञ या भुमीतील नागरीकाना अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे. तालुक्याचे आमदार यांचे या समस्याकडे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या पाच वर्षात ते इकडे फिरकले देखील नाहीत. यानंतर आता निवडणुक समोर दिसताच त्यानी थापा मारण्यास सुरूवात केली आहे. ते रस्त्याबद्दल बोलत नाहीत, पाण्या बद्दल बोलत नाहीत. येथील आगरी, कोळी समाजाच्या समस्याबद्दल बोलत नाहीत तर अटल सेतू बद्दल बोलतात. आगरी, कोळी, समाजाचा अवमान होईल असे बोलत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत शिट्टी या चिन्हापुढील बटण दाबून मला विजयी करावे असे आवाहन प्रितम म्हात्रे यांनी केले आहे.