जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी जनतेसोबत 24 तास असणाऱ्या युवा नेता प्रितमदादा म्हाञे याना विजयी करायचेय-सचीन ताडफळे

 जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी जनतेसोबत 24 तास असणाऱ्या युवा नेता प्रितमदादा म्हाञे याना विजयी करायचेय-सचीन ताडफळे


उरण : उलवे नोडमधील रहिवाशाना सिडको पाणी वीज शाळा प्रवेश अशा अनेक समस्या भेडसावत आहेत माञ गेल्या पाच वर्षात येथील रहिवाशाना स्थानिक आमदाराचे दर्शन झाले नाही. त्यामुळे नागरीक हैराण झाले आहेत. जनतेच्या या समस्या दूर करण्यासाठी 24तास जनतेसोबत असणारे युवा नेतृत्व प्रितमदादा म्हाञे यानाच प्रचड बहुमताने निवडून गरजेचे आहे असे प्रतिपादन शेकापचे डॅशिग नेते सचीन ताडफळे यानी केले.

        प्रितमदादा म्हाञे यांच्या प्रचाराच्या निमीत्ताने उलवे नोड येथे मतदाराच्या गाठीभेटी दौर्याचे आयोजन केले होते. त्यावेळी ते मतदाराशी हितगुज करताना बोलत होते. कार्यक्रमासाठी सोसायटीमधील रहिवासी युवा नेते अखिलेश, जेष्ट नेते जेएम म्हाञे, नारायणशेठ घरत, जितेंद्र म्हाञे आणि अनेक तरूण युवा कार्यकर्ते महिला उपस्थित होत्या. 
यावेळी बोलताना सचीन ताडफळे म्हणाले की सरकारने लाडकी बहिण योजना आणली माञ ही लाडकी बहिण निरोगी व दिर्घायुषी होण्यासाठी काही केले नाही. ते महत्वाचे काम प्रितमदादा म्हाञे करीत आहेत. स्ञीयांच्या ककर्रोग तपासणी, प्रतिबंधक लस देवून लाडक्या बहिणीला निरोगी राखण्याचे काम त्यानी निष्ठेने चालविले आहे. तसेच युवकाना रोजगार मिळवून देण्यासाठी सक्षम करणारे प्रशिक्षण मोफत उपलब्ध करून देवून युवकाचे भविष्य सुरक्षित करण्याचे काम ते करीत आहेत. त्यामुळे जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत असणाऱ्या या उद्याच्या सुर्याला साथ देणे आपले कर्तव्य आहे. यावेळी प्रितम म्हाञे यानीही आपले मनोगत व्यक्त करून उद्याच्या निवडणूकीत शिट्टी जोरात वाजविण्याचे आवाहन केले.
Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image