उरण महाविद्यालयाची दिवाळी आदिवासींसोबत

 उरण महाविद्यालयाची दिवाळी आदिवासींसोबत



उरण दि ३१(विठ्ठल ममताबादे )शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी उरण तालुक्यातील आदिवासी कातकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात येते. यावर्षी सारडे ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बेलडोंगरी या आदिवासी कातकरी वडीवर दिवाळी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात एकूण २५ महिलांना बारावारी व नऊवारी साडी, २७ पुरुषांना कपडे, १२ मुले व १२ मुलींना कपडे, शालेय साहित्य व दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य  के.ए. शामा सर यांनी यावेळी गरीब व आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या आपल्या बांधवांसोबत दिवाळी साजरा करण्याचा उद्देश सर्वांसोबत विशद केला व दिलेली भेट स्वीकारल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेकांनी आर्थिक मदत केली त्यामध्ये  के. ए.शामा रु.१५०००,तानाजी घ्यार रु.१००००, हितेंद्र घरत रु १००००, रोहित पाटील रु ५०००, नरेंद्र पाटील ४०००, तेजस आठवले २०००, नवीन राजपाल २०००, मंगेश म्हात्रे २०००, डॉ.ए.आर.चव्हाण २०००, प्रा. व्ही एस इंदुलकर २००० तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आर्थिक मदत केली. उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ,कपडे तसेच शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या घरी तयार केलेला दिवाळी फराळ अतिशय आनंदाच्या भावनेने आदिवासी बांधवांना सुपूर्त केला व त्या बांधवांसोबत दिवाळी पहाट संपन्न केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विशाल पाटेकर, तेजस बाळकृष्ण ठाकूर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्ता हिंगमिरे, माजी विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमात महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.

Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image