खारघरमधील गणपती बाप्पांचे वाजत-गाजत हनुमान तलाव सेक्टर-१५ येथे विसर्जन

खारघरमधील गणपती बाप्पांचे वाजत-गाजत हनुमान तलाव सेक्टर-१५ येथे विसर्जन


खारघर (प्रतिनिधी),दि.१८- खारघरमधील ७०% घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन हनुमान तलाव सेक्टर-१५ येथे होते.सालाबादप्रमाणे याही वर्षी वाजत-गाजत आणि ढोल ताशाच्या गजरात गणरायांना भाविकानकडून निरोप देण्यात आला.येथील गर्दीचे नियोजन आणि सुरक्षेची खबरदारी खारघरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ.वैशाली गलांडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चोख बजावली,तर गणेश मुर्तींच्या विसर्जनाची जबाबदारी पनवेल महापालिकेच्या पथकाच्या नियंत्रणाखाली स्वयंसेवकांनी आणि क्रेनच्या साहाय्याने पार पाडली.

     या सर्व विसर्जन सोहळ्यावरती पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव विधाते,श्री.संजय कटेकर श्री.गावडे,खारघरचे प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी हे जातीने लक्ष्य ठेवून होते.या विसर्जन सोहळ्यात शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने खारघरच्या माजी ग्रामपंचायत सदस्या सौ.उषा अडसुळे आणि शेकाप पनवेल विधानसभा उपाध्यक्ष श्री.अजित अडसुळे यांनी गणेश भक्तांसाठी,पोलीस बांधवांसाठी आणि महापालिकेच्या स्वयंसेवकांसाठी नाष्टा आणि पाण्याची मोफत व्यवस्था केली होती.

      या सोहळ्यासाठी सेक्टर-१५,१६,१७ आणि १८ मधील सर्वपक्षिय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने पहाटे ४ वाजेपर्यंत उपस्थित होते.

Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image