एनएमएमएस स्कॉलरशिप परीक्षेत कु. अविष्का महेश घरत ठाणे जिल्ह्यात प्रथम

एनएमएमएस स्कॉलरशिप परीक्षेत कु. अविष्का महेश घरत ठाणे जिल्ह्यात प्रथम


नवी मुंबई(प्रतिनिधी)- एनएमएमएस स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.सदर परीक्षेत कु. अविष्का महेश घरत हिने ठाणे जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. 

         अविष्का महेश घरत ही ज्ञान विकास संस्था कोपरखैरणे नवी मुंबई या विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. यापूर्वी तिने प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ८७.३३% गुण मिळवून नवी मुंबई विभागात प्रथम क्रमांक पटकाविला होता.

      एनएमएमएस स्कॉलरशिप परीक्षेत अविष्का घरतने  मिळविलेल्या या घवघवीत यशात  सारिका अजित देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. सदर परीक्षेत ज्ञान विकास विद्यालयाचे ओमकार तानाजी काळे, वैष्णवी संतोष शेलार, शिवराज अनिल चटाले, सत्यवान संदीप धापते, आयुष किशोर सोलंकर, रसिका रमेश शेळके, दिशा रामू महाले हे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहे. सदर परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आली होती. या परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना पाच वर्षासाठी तब्बल साठ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.

         विद्यार्थ्यांना मिळालेल्या या यशा बद्दल विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाचे  संस्थापक अध्यक्ष पी.सी. पाटील, ज्येष्ठ संचालक बळीराम म्हात्रे, प्रशासकीय अधिकारी रामदास बिडवे, अध्यक्ष प्रसाद पाटील, मुख्याध्यापक एस. एस. कापडणीस ,शिक्षक व  शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.

Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image