जे.एम.म्हात्रे चॕरिटेबल ट्रस्टने रानसई आणि वेश्वी आदिवासीं वाड्यांवरील आदिवासीं बांधवांना केलं जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

जे.एम.म्हात्रे चॕरिटेबल ट्रस्टने रानसई आणि वेश्वी आदिवासीं वाड्यांवरील आदिवासीं बांधवांना केलं जीवनावश्यक वस्तूंचे वाटप 


पनवेल :  दूर - दुर्गम ,डोंगर - दऱ्यांत राहणाऱ्या आदिवासीं  बांधवांच्या घरची बेताची परिस्थिती आणि काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या भयानक परिस्थितीत त्यांच्या रोजी - रोजगाराची साधनंच उध्वस्त होऊन त्यांचं जगणंच मुश्किल झालेलं आहे या परिस्थितीत त्या आदिवासीं बांधवांच्या सुख - दुःखात त्यांच्या हाकेला धाऊन जावून त्यांना मदतीचा हात देणारे. जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेलचे.अध्यक्ष  प्रितम म्हात्रे यांच्या औदार्यातून...आणि केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक  राजू मुंबईकर यांच्या माध्यमातून ... आज ...उरण - रानसई येथील ... *चांदयली आदिवासींवाडी, ...भुऱ्याचीवाडी, ...मार्गाचीवाडी, बंगल्याचीवाडी,...सागाचीवाडी*  ...आणि ... *वेश्वी आदिवासींवाडी* या आदिवासीं वाड्यांवरील आदिवासीं बांधवांना ...*तांदूळ, गव्हाचपीठ,साखर, डाळ, मीठ,चहापावडर, साबण, बिस्किटं* ... या प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं गेलं ...आणि... महिला भगिनीं करिता *साड्यांच* वाटप देखील करण्यात आले.

         राजकारण आणि समाजकारण यांची योग्य ती सांगड घालत आपल्या सेवाभावी स्वभावाने सामाजिक कार्याचा वसा जपणारे ... जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेलचे...अध्यक्ष ... *मा.श्री.प्रितमदादा म्हात्रे साहेब* यांनी आज पर्यंत समाजातील गोर - गरीब ,दुर्लभ घटकांना,आदिवासीं बांधवांना सदैव मदतीचा हात देऊन त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात ,...त्यांच्या करिता संकट समयी एक आशेचा किरण बनून त्यांच्या पुढे उभे असतात ....त्याच सोबत...*मा.श्री.राजू मुंबईकर साहेब* हे सुध्दा आपलं सामाजिक दायित्व जपतं या आदिवासीं बांधवांकरिता सदैव झटत असतात आणि याच सामाजिक जनिवतेतून आज या आदिवासीं वाड्यांवर साकारलेल्या मदतरुपी अन्न - धान्य वाटप कार्यक्रमा दरम्यान आदिवासीं बांधवांनां मिळालेलं हे शिदोरीसाठीचं सामान घेऊन जाताना त्या माय - भगिनिंच्या चेहऱ्यावरचा तो ओसंडून वाहणारा आनंद पाहण्या जोगा होता .
      जे.एम.म्हात्रे.चॅरिटेबल संस्था पनवेलचे...अध्यक्ष ... *मा.श्री. प्रितमदादा म्हात्रे साहेब* यांच्या औदार्यातून....आणि...केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे... संस्थापक ...*मा.श्री. राजू मुंबईकर साहेब* ...यांच्या माध्यमातून साकारलेल्या या मदतरुपी जीवनावश्यक वस्तूंच्या वाटप कार्यक्रमा करिता उपस्थिती दर्शविली ती... केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे... अध्यक्ष... *मा.श्री. स्नेहलजी पालकर साहेब* आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्था उरण तालुका सचिव... *मा.श्री.अनिल घरत*, वेश्वी गावचे सामाजिक कार्यकर्ते...*मा.श्री.विनोद दादा पाटील*, कॉनचे वेश्वी शाखा अध्यक्ष... *मा.श्री. सुरेन्द्रजी पाटील*, गोल्डन ज्युबली मित्र मंडळ सारडेचे मा अध्यक्ष.. *मा.श्री.नवनीत पाटील* मित्र परिवाराचे कार्याध्यक्ष ... *मा.श्री.क्रांती म्हात्रे* युवा कार्यकर्ता... *कु.रचित म्हात्रे,मयुरेश पाटील,हिमांशू पाटील, दिपक दोरे* आणि सर्व आदिवासीं बांधवांच्या उपस्थितीत हा प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image