राज्याच्या नियोजनबद्ध अंमलबजावणीने योजना सर्वदूर पोहचल्या - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 केंद्राच्या योजनांमध्ये राज्याचा मोठा वाटा

राज्याच्या नियोजनबद्ध अंमलबजावणीने योजना सर्वदूर पोहचल्या

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


पंधरा जिल्ह्यातील लाभार्थींशी साधला संवाद

पक्षभेदराजकारण विसरून लोकांपर्यंत लाभ पोहचविणे महत्वाचे



 

            मुंबई, दि. 31 : योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या असोतत्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्याच्या यंत्रणेचे मोठे योगदान असते.  हे प्रयत्न पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित झाले पाहिजेत. मला आनंद व समाधान आहे कीया योजना राज्यजिल्हातालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणेने नियोजनपूर्वक लाभार्थींपर्यंत यशस्वीरित्या पोहचविल्या असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

            विविध केंद्रीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थीशी सह्याद्री अतिथीगृहातून दूरदश्यप्रणालीद्वारे संवाद साधतांना ते बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत ग्रामविकास विभागाने राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन केले होतेत्यानिमित्त मुख्यमंत्री बोलत होते.

            यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रत्येक लाभार्थीशी संवाद साधून त्यांना योजनांचा लाभ कसा मिळाला तसेच त्यांच्या आणखी काही अपेक्षा आहेत का ते जाणून घेतले. ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.