पनवेल महानगरपालिकेचे संजय कटेकर यांना शहर अभियंता पदावर बढती

पनवेल महानगरपालिकेचे संजय कटेकर यांना शहर अभियंता पदावर बढती


पनवेल(प्रतिनिधी)-पनवेल महानगरपालिकेतील कार्यकारी अभियंता(प्रकल्प)श्री.संजय कटेकर यांना शहर अभियंता या पदावरती बढती मीळाली असून महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनकडून आणि महाराष्ट्र राज्यातील उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांनकडून त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

      गेल्या काही वर्षांपासून पनवेल महानगरपालिकेत ते कार्यकारी अभियंता म्हणून सेवा देत असून त्यांचे पुर्वसुरी शहर अभियंता श्री.संजय जगताप यांच्या निवृत्तीने रिक्त झालेल्या पदावरती ताबडतोब बढती देऊन प्रशासनाने एका चांगल्या अधिकाऱ्यांस जनतेची सेवा करण्याची संधी उपलब्द करून दीली आहे.

      महापालिका आयुक्त सन्माननिय मंगेश चितळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जबाबदारीने मी माझ्या पदाला साजेशी कामगीरी करण्याचा प्रयत्न करीन असे श्री.कटेकर यांनी जनसभाच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगीतले.आयुक्त श्री.चितळे म्हणाले की प्रशासन नेहमीच अशा प्रामाणिक,कुशल व कामसू अधिकाऱ्यांच्या शोधात असते.शहर अभियंता ही खूप मोठी जबाबदारी असून श्री.कटेकर यांना आपल्या कामाचा ठसा उठवीण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दीले जाईल.

Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image