छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव निमित्त श्रीमंत कोकाटे यांचे अभूतपूर्व मार्गदर्शन
नवीन पनवेल : छत्रपती क्रांती सेना, पनवेल यांच्यातर्फे छत्रपती संभाजी महा
विविध दाखले देऊन छत्रपती संभाजी राजांच्या कार्याची महती त्यांनी मांडली. चुकीचा इतिहास सांगून महाराजांना बदनाम करणाऱ्यांना सांगलीच चपराक कोकाटे यांच्या भाषणातून जाणवली. शिवाजी महाराज असोत किंवा छत्रपती संभाजीराजे असो हे कधीही जातीपातीची लढाई लढले नाहीत तर अठरा पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती त्यांनी केली. कित्येक मुस्लिम बांधवानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिवरायांच्या बाजूने प्रमुख भूमिका बजावली आहे. स्वराज्य स्थापनेच्या दृष्टिकोनातून जोजो स्वराज्याच्या आड येईल त्याला आडवा करण्याचे काम महाराजांनी केलं. स्वराज्यावरती आणि रयतेवर अपार प्रेम, एकनिष्ठता, कर्तव्यनिष्
घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, आचार्य अत्रे, अमर शेख यांच्या जीवनातील अनेक दाखले श्रीमंत कोकाटे यांनी या भाषणात दिले. रायगडच्या मातीचा इतिहास वेगळा आहे याच रायगडाने महाराष्ट्राला आणि देशाला भरपूर काही दिलं आणि खऱ्या अर्थानं देशाच्या इतिहासाचा साक्षीदार रायगड जिल्हा असल्याचे त्यांनी म्हटलं. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली. त्यामध्ये महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके, शेतकरी कामगार पक्ष तालुका चिटणीस राजेश केणी, क्रांतिकारी सेवा संघाचे नामदेव फडके, सामाजिक कार्यकर्ते शेखर शेळके, प्राचार्य अनंता धरणेकर, उद्योजक प्रदीप भोपी, ग्रामपंचायत सदस्य संदीप म्हस्कर, चंद्रकांत पोपटा, ॲड चेतन केणी, अनिल ऊलवेकर, संजय केणी. आकूर्ली आणि सुकापूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रांती सेनेच्या श्रेयस म्हसकर, गुरुनाथ पोपेटा, बाबा कांबळे, विश्वास पाटील आणि कार्यकर्त्यांच्या वतीने जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.